Posts

एकत्र कुटुंब..हे कुटुंब तब्बल २७ जणांचे..स्वतः तर जगतात,आणि आपल्या शेतीलाही मस्तपैकी जगवतात.

Image
एकत्र कुटुंब.. हे कुटुंब तब्बल २७ जणांचे..स्वतः तर जगतात,आणि आपल्या शेतीलाही मस्तपैकी जगवतात. आजच्या शहरी विभक्त कुटुंबपद्धतीत आदर्श .. कोल्हापूरतील हे कुटुंब तब्बल २७ जणांचे आहे. साबण, मीठ आणि चहापावडर या तीनच वस्तू ते विकत आणतात. बाकी तीळ, खसखसपासून ते वर्षभर पुरेल एवढ्या भाज्या, फळे, तेल, धान्य, डाळी ते शेतात पिकवतात. आवळ्यापासून फणसापर्यंत सगळ्या फळांचा मनसोक्‍त आस्वाद घेतात. बहुतेक पिकांसाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यामुळे हिरव्यागार टवटवीत भाज्या आहारात रोज वापरतात. सांगायची गोष्ट एवढीच, की घरातले सगळे मनापासून शेतावर राबतात आणि आनंदी, आरोग्यदायी जीवन जगतात. कोगे (ता. करवीर) येथील लहू सावबा मोरे यांच्या कुटुंबाची ही ताजी टवटवीत करणारी एक कथाच आहे. करवीर तालुका तसा शेतीच्या दृष्टीने सधन. मोरे कुटुंबाचीही साधारण 12 एकर जमीन. सगळा नुसता ऊस लावला तरी वर्षभर व्यवस्थित जगू शकणारं हे कुटुंब. पण, शेतीत स्वतः राबून, नवे प्रयोग करून विविध पिकं पिकवण्याचा या कुटुंबाला ध्यास. त्यामुळे केवळ उसावर भर न देता त्यांनी वेगवेगळ्या पिकांवर भर दिला आणि बाहेरून घरात फारसं विकत आणावया...

पुण्यात कुठे काय खावे, हे आवर्जून वाचा🍔🧇🥙🌮🥗🍲🥮🥯🥨खास खादाड मंडळींसाठी: पुणे

Image
पुण्यात कुठे काय खावे, हे आवर्जून वाचा 🍔🧇🥙🌮🥗🍲🥮🥯🥨 खास खादाड मंडळींसाठी: पुणे १) बिपिन स्नॅक्स सेंटर - इथले पोहे , ब्रेड पॅटीस आणि काकडी खिचडी लाजवाब आहे.. पत्ता - विमलाबाई गरवारे शाळेच्या बाजूला , डेक्कन कॉर्नर , पुणे २) अप्पा गुरुदेव स्नॅक्स - इथला उपमा , शिरा , समोसा चटणी भारी असते. इथला उपमा अन् चटणी माझा विक पॉइंट आहे.  पत्ता - शगुन चौक , लक्ष्मी रोड , पुणे  ३) अण्णा - इथले पोहे खूप भारी असतात. चटणी आणि सांबर शिवाय ज्या पोह्याना चव असते अश्या पठडीतले . पत्ता - शनिवार वाड्याच्या बाजूला , कसबा पेठ पोलिस चौकी , शेजारी , पुणे ४) सुशील - इथले पोहे म्हणजे केवळ लाजवाब.. एकदम आगळीवेगळी चव.. कोथरुड ते नवी पेठ रोजचा प्रवास खास ह्या पोह्यांसाठी व्हायचा.  पत्ता - नवी पेठ , लाल बहादुर शास्त्री रोड , प्रेमाचे साई हॉटेल च्या बाजूला, पुणे ५) हिंदवी स्वराज - ह्याच्या वेगवेगळया गाड्यावर मिळणारी डाळ खिचडी तडका , शेवभाजी भारी आहे . ह्याचा कोअर विषय हा साजूक तुपातला साबुदाणा वडा अन् काकडी चटणी हा आहे... पत्ता - जंगली महाराज मंदिराच्या विरुद्ध दिशेला आत , जे एम रोड ,...

गेवराईत 'त्रि' कोन पंडित , पवार आणखी कोण - क्रॉसलाईन धनगर माळी आणि बंजारा

Image
गेवराईत 'त्रि' कोन पंडित , पवार आणखी कोण - कोण क्रॉसलाईन    धनगर माळी आणि बंजारा - वंजारा असा ओबीसीचा मोठा टक्का असलेला मतदार आकुंचन पावला जात असल्याचे चित्र आहे , यावरून गेवराईत कोण हा सवाल उत्तरीत करूयात म्हणजे कयास पातळीवर . तसा तालुका पंडित पवारांच्या थोरल्या पिढी संघर्षातून अर्थात माधवराव शिवाजीराव या दिग्गज नावांनी तालुका आपल्या वसरीवर ठेवला , मात्र पंचायत समितीच्या चाव्या वरून पुतणे बदामराव बाजूला सरकले , नवगण गणपती व परळीचा वैद्यनाथाचा आशीर्वाद घेऊन १५ वर्षे बदामराव पंडित विधान सभेत राहिले. रांगड्या स्वभावाचा हा धनी माणूस हौसेने आमदार होत राहिला , पंडित मुक्तीने आणि बाळराजे पवारांची शहरातील कुमक कामाला लागल्याने लक्ष्मण पवार आमदार झाले , पवारांच्या दुसऱ्या पिढीने १० वर्षे मागे टाकताना लोकमान्यता मिळवली , अगदी द्यायचे तर द्या नाहीतर देऊ नका या टोकाचा प्रचार करून एकतर्फी मतदार जिंकणारा आमदार म्हणून लक्ष्मण पवारांनी पंडित कोंडी फोडली . शालीन आणि सरळ असलेले लक्ष्मण पवार २४ च्या आखाड्यात तिसऱ्यांदा येतील का ? काम मग थांबतील अशी एक शंका आहे कारण , वर्तमान वाताव...

एकमेकांना सहकार्य करायला शिका .. मग काय फरक पडतो सरमोचा व्यक्ती ओळखीचा आहे कि परका, रक्ताच्या नात्यातला आहे कि मानलेला...चांगले कर्म करा देव त्याचे फळ तुम्हाला नक्कीच देईल..☺जय महाराष्ट्र...⛳

Image
सकाळी बस मधून प्रवास करताना एक अनुभव आला तो सांगतो.. . रोजच्या प्रमाणे बस मध्ये गर्दीच होती.. मी बस मध्ये चढलो माझ्या मागोमाग एक म्हातारे आजोबा चढले.. बाळा मला जरा पुढे जाऊदे असे म्हणताच मी त्यांना पुढे जायला जागा दिली.. पण तिथे एक सीट रिकामी होती.. गर्दीने भरलेल्या बस मध्ये ती एकच सीट रिकामी होती खिडकी जवळची सीट... आणि त्या सीट च्या बाजूच्या सीट वर एक तरुण मुलगी बसली होती.. त्या आजोबांनी तिला त्या सीट वर बसायला सांगितले..  आजोबा - पोरी थोडी तिकडे सरकतेस का मला बसुदे इथे.. मुलगी - दिसत नाही का तुम्हाला ? त्या सीट वर पावसाचे पाणी पडलंय ते ? आजोबा - पोरी मला इथेच थोड पुढे उतरायचं आहे थोड बसुदे.. मुलगी - एकदा सांगून कळाल नाही का ? कि वयानुसार अक्कल पण गेली? हा सर्व प्रकार माझ्या समोरच होत होता..  तिने एवढ्या उद्धट भाषेत बोलल्यावर माझी सटकली 😁 पण मी त्या मुलीला काही बोललो नाही..  सरळ माझ्या खिशातून रुमाल काढला ती सीट आजोबाना पुसून दिली आणि त्यांना बसायला सांगितले...  माझा हा प्रकार बघून तिची तिला लाज वाटली असावी..  कारण तिने लगेच मान खाली घातली.. आजोबा ...

#जलशारदा जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. अमरसिंह पंडित साहेब यांनी गेवराई तालुक्यात "प्रकल्प जलशारदा"

Image
#जलशारदा  जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. अमरसिंह पंडित साहेब यांनी गेवराई तालुक्यात "प्रकल्प जलशारदा" हा महत्वकांक्षी प्रकल्प राबवून सिंचन सुविधा वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.   नाम फाउंडेशन आणि शारदा प्रतिष्ठान, गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे पाचेगाव ता. गेवराई येथे प्रकल्प जलशारदा अंतर्गत परिसरातील ओढ्याचे पाच किलो मिटर खोलीकरण, सरळीकरण, विस्तारीकरण आणि बंधाऱ्याचे पुनर्जीवन करण्याचे काम यावर्षी उन्हाळ्यात पुर्ण केले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे हे ओढे व त्यावरील बंधारे पाण्याने तुडूंब भरले आहेत. जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कामामुळे सुमारे शंभर ते दिडशे एकर शेती ओलिताखाली येणार आहे. बेली तांडा आणि पाचेगाव परिसरातील शेतकरी या कामामुळे अतिशय आनंदी आहेत.  माजी आमदार श्री. अमरसिंह पंडित साहेब यांनी राजकारणा पलीकडे जावून गेवराई तालुक्यातील सिंचनाच्या सुविधा वाढविण्यासाठी केलेले मोलाचे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.   Amarsinh Pandit Vija...

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करु इच्छितो-

Image
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करु इच्छितो- १. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.१ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. २. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत. ३. सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. ४. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे. ५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला अस...

धनगर व वडार समाजाला एस्. टी. आरक्षण लागू करण्यासाठी आमरण उपोषण

Image
धनगर व वडार समाजाला एस्. टी. आरक्षण लागू करण्यासाठी आमरण उपोषण बीड : देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यात धनगर व वडार समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षणाची अंमलबजावणी करा त्यामुळे या दोन्ही समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगती होईल म्हणून भाई आकाश निर्मळ यांनी धनगर व वडार समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण लागू करा या मागणीसाठी त्यांनी लोकशाही मार्गाने उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे आजचा त्यांचा दुसरा दिवस आहे. उपोषणकर्ते भाई आकाश निर्मळ यांना पाठिंबा देण्यासाठी येणारा प्रत्येक जण आपली भावना व्यक्त करताना धनगर व वडार समाजाची फसवणूक करून मराठा ओबीसी वाद पेटविण्याच्या तयारीत असल्याचे सांगत आहेत  धनगर व वडार समाजाची मुळ एस.टी आरक्षण आहे पण त्याची अंमलबजावणी आजपर्यंत सत्तेत आलेल्या सरकारने केली नाही.  कारण देशातील ईतर राज्यात धनगर व वडार समाजाला एस.टी आरक्षण लागू आहे पण फक्त महाराष्ट्र राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळे ते आजपर्यंत लागु झाले नाही.  हे सर्व सोडून ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करत फिरणारे स्वयंघोषित नेते समाज द्रोह करीत असल्याचे मत उपस्थितांकडून व्यक्त केले जात आ...