झाडाची मुळे ही निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन असते.
झाडाची मुळे ही निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन असते. १) *एक कडूनिंबाचे झाड, दहा हजार लिटर पाणी _संपूर्ण पावसाळ्यात_ जमिनीत घेऊन जाऊ शकते.* _याचा अर्थ, आपल्या परिसरात किमान ३० झाडं निंब, चिंच, जांभळ, आंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असावीत._ म्हणजे, मृत साठ्याचे पाणी पाझरत रहाते. २) *एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाड, एका हंगामात एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते.* [आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात.] ३) *एक कोटी लिटर म्हणजे एका सर्वसाधारण घरगुती विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी.* _याचा *गणितीय हिशोब* सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो. ४) *म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा.* ५) आपण एका बोअरवेलसाठी एक लाख ₹. खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख ₹. खर्च करतो.पण पाण्याची कुठलीच शाश्वती नाही. ...