Posts

Showing posts from November 8, 2023

चाहूल दिवाळीचीकुठे गेले ते दिवस

Image
चाहूल दिवाळीची कुठे गेले ते दिवस एव्हाना सहामाही परीक्षा संपून सुट्टी सुरु झालेली असायची. दसऱ्यापासूनच थंडी पडायची आणि दिवाळी येईपर्यंत ती वाढत जायची. दिवसभर खेळून हाथ-पाय थंडीने उकलायचे. किल्ला गारूच्या मातीने भगवा करून टाकायचा. त्यावरचे हळीव चांगलेच वाढायचे. सलाईनच्या कारंज्यात दिवसभर पाणी भरत बसायचे. वाऱ्याने मावळे पडायचे. चिखल सुकून बुरुजाला भेगा पडायच्या. दिवस जायचा 'गड' राखण्यात !! फटाक्यांची भलीमोठी यादी कधीच तयार असायची. मग मातीचा गल्ला फोडला जायचा. त्यात सापडायची इकडून तिकडून उचललेली आठ-आणे रुपयाची नाणी. फटाके आणायला खारीचा वाटा. फटाक्याच्या दुकानात अधाश्यासारख व्हायचं. लवंगी, लक्ष्मी, सुतळी, कनकावळे, भुईनुळे, चक्र, फुलझडी, नागगोळी, टिकल्या आणि पिस्तुल. पिशवी गच्च भरायची. एकदम 'श्रीमंत' झाल्यासारखं वाटायचं. घरी येवून छोट्या भावाबरोबर त्याची वाटणी व्हायची. अगदी वात गळालेल्या फटाक्यांची सुद्धा !! हाताला छान चांदीसारखा दारूचा रंग लागायचा. भारी वाटायचं. हीच काय ती दारू माहिती तेव्हाची !! 'पोरानो, लवकर झोपा. सकाळी अभ्यंगस्नानाला उठायचं आहे' - आज...

*अग्रीम पीक विम्याची* रक्कम वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Image
आज राज्यातील 16 जिल्ह्यातील 35 लाख 08 हजार शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून, Mid adversity survey (अंतरिम नुकसानीचे अहवाल) व त्यानुसार संबंधित जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या अधिसूचना याला अनुसरून राज्यातील 35 लाख 08 हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर एकूण 1 हजार 700 कोटी 73 लाख एवढी *अग्रीम पीक विम्याची* रक्कम वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अग्रीम 25% प्रमाणे या विम्याचे वितरण करण्यात येत आहे.  काही जिल्ह्यातील पीकविमा कंपन्या या अपिलात गेलेल्या आहेत. त्यांच्या अपिलावरील सुनावण्या पूर्ण झाल्यानंतर शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याच्या रक्कमेत आणखी मोठी वाढ होणार आहे.  राज्य सरकारने प्रथमच 1 रुपयात पिकविमा योजना राबवली, ती राज्यातील 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी आपला विमा एक रुपयात भरून यशस्वी करून दाखवली.  राज्यात खरीप हंगामात हवामानातील असमतोल, कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ सदृश परिस्थिती अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पीकविमा मिळणे व तो वेळेत मिळणे याबाबत मी सातत्याने आग्रही होतो.  राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी...