प्रवास नेमकाच ग्रॅजुयट झाल्यानं मलं पोस्ष्ट ग्रॅजुएशनसाठी औरंगाबादलं जायाच व्हतं.
प्रवास नेमकाच ग्रॅजुयट झाल्यानं मलं पोस्ष्ट ग्रॅजुएशनसाठी औरंगाबादलं जायाच व्हतं. तिथल्या कॉलेजात मव्हा नंबर लागला व्हता.पहाटं नवची एष्टी व्हती.नवनंतर एष्टी नसल्यानं म्या पाहाटं लवकरच गडबडीनं आटपुण निंघायची तयारी केली.निघंतानी पुन्हा एकदा कागदपत्र निट तपासले.मायनं गडबडीत दोन चार भाकरी आन मिरचीचा ठेचा मलं बांधुन देलता.गावापसुन एष्टी थांबा तिनेक किलोमिटर लांब आसल्यानं मि साडेसातलच घराबाहीर पडलो.सगळा सस्ता सामसुम व्हता.मी आपलं एष्टी हुकु नाही मनुन झपाझप चालत एकदाचा फाट्यावर येऊन एष्टीची वाट पहात बसलो.फाट्यावर ना निवारा व्हता ना पाण्याची सोय व्हती.तिथं मह्या सारखे एक दोन प्रवासी आन दोनचार मोकाट कुत्रे सोडले तं काय बी नवतं.एष्टीचा नवचा टाईम व्हता.साडेनव झाले तरी आंजुक एष्टि आली नवती.म्या आपला तिन तिनदा घड्याळात टाईम पाहु लागलो.मलं हि एष्टी हिंगोलीलोकच व्हती.तिथुन आकरा वाजताची एष्टी पकडायची व्हती.मह्या मनाची तळमळ व्हवु लागली.आकराची एष्टी चुकली तं डबल तिनलोक दुसरी गाडी नवती.आश्यात औरंगाबादलं जायालं उशीर झाला आसता.मी ईचार करतच व्हतो तेव्हड्य...