आम्ही चांगले असू किंवा वाईट, पण आमचाही एक #जमाना' होता
आमचाही एक जमाना होता बालवाडी हा प्रकार नव्हता, पुढे 6 वर्षा नंतर स्वतःच शाळेत जावे लागत असे , सायकलने/ बसने पाठवायची पद्धत नव्हती, मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी भीती आमच्या आई वडिलांना कधी वाटलीच नाही. 🤪 पास / नापास हेच आम्हाला कळत होतं... टक्केचा आणि आमचा संबंध कधीच नव्हता. 😛 शिकवणी लावली, हे सांगायला लाज वाटायची.... कारण "ढ" असं हीणवलं जायचं... 🤣🤣🤣 पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपिस ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो, असा आमचा दृढ विश्वास होता... ☺️☺️ कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मिती कौशल्य होतं. 😁 दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे, हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा... 🤗 वर्ष संपल्यानंतर पुस्तके विकणे आणि विकत घेण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नसे. 🤪 आई वडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजाही नव्हते. ...