*कुणी लिहिलंय माहीत नाही,**पण आम्हीं अनुभवलंय;**हे वास्तव आहे....*
*कुणी लिहिलंय माहीत नाही,*
*पण आम्हीं अनुभवलंय;*
*हे वास्तव आहे....*
*तीन चांगल्या गोष्टी* आमच्या बाबतीत
सुदैवाने लवकर झाल्या.
१) मॅगी यायच्या आत आम्ही *मोठे* झालो._
२) Mobile यायच्या आत
आमचे *शिक्षण* झाले.
आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे
३) Whatsapp यायच्या आत
आमचे *लग्न* झाले.
आमच्या लहानपणी इंग्रजीचं
फॅड अजिबातच नव्हतं.
ABCD .......XYZ याचा संबंध *फक्त शाळेत* गेल्यावर, ते ही इंग्रजीच्या तासालाच !
आणि आता
ABP माझा, CID, MRI, X-ray, Blood, Star TV, Z-TV *विचारूच नका.*
आमच्या लहानपणी,
*This is Gopal. आणि That is Seeta.*
ही दोन वाक्ये पाचवीत गेल्यावर वाचता यायचे, तरी घरी *जबरदस्त कौतुक* व्हायचं !
आई लाडानं जवळ घ्यायची
आणि मायेनं मुका घ्यायची.
आई लेकराकडे इतक्या कौतुकाने पहायची,
की त्या पोराला *एकदम कंडक्टर* झाल्या सारखंच वाटायचं !
अहो कंडक्टर याच्यामुळे की .....
आमच्या लहानपणी एखाद्या पोराला मोठ्या माणसाने विचारले,
हं sss काय रे बाळा, मोठेपणी तू काय होणार ?
असा प्रश्न विचारला की ते पोट्टं हमखास म्हणायचं .....
*मी मोठेपणी कंडक्टर* होणार
किंवा *पोलीस* होणार !
तुम्हाला खोटं वाटेल, मॅट्रिकचा निकाल लागल्यावर तुला *किती परसेंटेज* मिळाले असा प्रश्न कोणीही कुणाला विचारत नव्हतं.
फक्त एवढंच विचारायचे ....
*पहिल्या झटक्यात पास झालास ना ?*
आणि
आपण हो म्हणताच
*अख्ख्या गावाला आनंद व्हायचा.*
म्हणजे पहा सुखाच्या, आनंदाच्या,
मोठं होण्याच्या कल्पना
*किती छोट्या होत्या !*
लक्षात घ्या, ज्या ज्या गोष्टीचा विस्तार होतो,
त्या त्या गोष्टीतून *दुःखच होतं.*
तुम्ही बघा, पूर्वी ....
*गाव छोटं, घर छोटं, घरात वस्तू कमी, पगार कमी,* त्याच्यामुळे शेवटचा आठवडा हमखास तंगी. उसनंपासनं केल्या शिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता,
*तरीही मजा खूप होती!*
तुम्ही आठवून पहा, गल्लीतली एकही बाई किंवा माणूस हिरमुसलेलं किंवा आंबट
चेहऱ्याचं नव्हतं !
उसनंपासनं करावंच लागायचं ...
*साखर, चहापत्ती, गोडेतेल, कणिक, कोथिंबीर, मिरची* या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसन्या मागणे हा प्रत्येकाचा
*जन्मसिद्ध हक्कच होता.*
त्यामुळे कोणाकडे "हात पसरणे" म्हणजे काहीतरी गैर आहे, असं आम्हाला कधी
वाटलंच नाही.
उलट या गोष्टींची इतकी सवय होती की,
*कोणत्याच गोष्टींचा कधीच कमीपणा*
वाटत नव्हता !
डोकं दुखल्यावर *शेजाऱ्याकडे अमृतांजनचं एक बोट उसनं मागायला सुद्धा* अजिबात लाज वाटली नाही.
घरातल्या वडील माणसासाठी १० पैश्याच्या तीन बिड्या किंवा १५ पैशाचा तंबाखूचा पुडा *आणतानाही मान कशी ताठ असायची !*
कोणतीच गोष्ट कोणापासून लपून रहातही नव्हती आणि *तसा प्रयत्नही फारसा कुणी करत नव्हतं !*
गल्लीत एखाद्या पोरीला पाहुणे पहायला येणार ही बातमी लपून राहूच शकत नव्हती,
कारण शेजाऱ्या-पाजाऱ्या कडून पोह्याच्या प्लेट, चमचे, बेडशीट, तक्के, उषा, दांडी असलेले कप आदी साहित्य मागून आणल्या शिवाय *"पोरगी दाखवायचा कार्यक्रम"* होऊच शकत नव्हता.
आणि मित्र हो, हीच *खरी श्रीमंती* होती,_
ते आत्ता कळतंय !
आणि
हल्ली शेजाऱ्याच्या मुलीचं *लग्न होऊन जातं* तरीही कळत नाही.
जेव्हा Status वर डान्सचा व्हिडीओ येतो तेंव्हा कळतं,
अरे लग्न झालं वाटतं.
हे सगळं लिहिण्या मागचा एकच उद्देश आहे.
*भेटत रहा,*
बोलत रहा,
*जाणे-येणे ठेवा,*
विचारपूस करा .....
*जेवलास का ? झोपलास का ?सुकलास का ? काही दुखतंय का ?*.......
.............
असे प्रश्न विचारतांना लागलेला *मायेचा, काळजीचा, आपुलकीचा कोमल स्वरच* जगण्याचं बळ देत असतो !
*माणसा शिवाय, गाठीभेटी शिवाय,*
*संवादा शिवाय काही खरं नाही !*
🤝🤝🤝
🌹🙏🏻🌹
Comments
Post a Comment
JD