Posts

स्‍मृति मंधानाने ठोकले वनडे करिअरचे 11 वे शतक, श्रीलंकेविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी

Image
❤️ स्‍मृति मंधानाने ठोकले वनडे करिअरचे 11 वे शतक, श्रीलंकेविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी .. भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिचा वनडे क्रिकेटमधील जबरदस्त प्रवास सुरूच आहे. कोलंबो येथे झालेल्या त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात तिने श्रीलंकेविरुद्ध कारकिर्दीतील 11 वे शतक झळकावून इतिहास रचला आहे. 101 चेंडूंमध्ये 116 धावा करत स्मृतीने भारतीय संघाला 50 षटकांत 7 गडी गमावून 342 धावांपर्यंत नेले. ही धावसंख्या श्रीलंकेसाठी एक आव्हानात्मक लक्ष्य ठरली. ❤️ शतकासह मोठा विक्रम या शतकासह स्मृतीने महिला वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. ती आता ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंग (15 शतके) आणि न्यूझीलंडच्या सूजी बेट्स (13 शतके) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडच्या टैमी ब्यूमोंटला मागे टाकले असून, ब्यूमोंटच्या नावावर 10 शतके आहेत. ❤️ स्मृतीची जबरदस्त खेळी स्मृती मांधनाने 15 चौकार आणि 2 षटकारांसह 116 धावांची खेळी केली. तिचा स्ट्राइक रेट 114.85 इतका होता. डावाची सुरुवात करताना तिने प्रतिका रावलसोबत 70 धावांची भागीदारी केली. प्रति...

भारत पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता ?

Image
भारत पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता ? सायरन वाजवण्याचेही सर्व राज्यांना निर्देश. संपूर्ण भारत देश हाय अलर्ट वर गृहमंत्र्यालयाचे आदेश . 🚨 🪖 - शत्रूच्या हल्ल्याच्या वेळी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरी संरक्षण पैलूंवर नागरिक, विद्यार्थी इत्यादींना प्रशिक्षण देण्याचेही आदेश.  - - निर्वासन योजनेचे अद्यतन आणि त्याची तालीम एखाद्या हवाई हल्ल्यात कोठे अडकले असल्यास तेथून सुखरूप बाहेर पडण्याचे तालीम घेण्याचे ही आदेश.  pointnewsmarathi.blogspot.com

बोंबला ! बीडला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये निघाली तीन सडलेली कुत्रे ?

Image
बोंबला ! बीडला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये निघाली तीन सडलेली कुत्रे ? हे सत्य की अफवा ? बीड नगर परिषद प्रशासनाने तात्काळ खुलासा करावा : मागणी फिल्टर पॉईंट ते माजलगाव 40 किलोमीटर अंतर पाईपलाईनमध्ये आणखी काय काय आहे देव जाणो? बीड शहरातील अनेकांच्या घरात पाईपलाईनमधील सडलेल्या अशुद्ध लाखो लिटर पाण्याचा स्टॉक असल्याची माहिती कुत्र्यांमुळे दूषित झालेले पाणी सोडून दिल्याने उमरीच्या नदीला पूर ?

Ipl 2025 : मुंबईची पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप, टॉप 5 मध्ये मोठा बदल, 3 संघांना झटका.

Image
Ipl 2025 : मुंबईची पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप, टॉप 5 मध्ये मोठा बदल, 3 संघांना झटका IPL 2025 Points Table MI vs LSG : मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियममध्ये लखनौ सुपर जायंट्सचा धुव्वा उडवत मागील पराभवाचा हिशोब क्लिअर केला. तसेच मुंबईच्या या विजयामुळे पॉइंट्स टेबलमधील चित्र पूर्णपणे बदललं.  आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने 18 व्या मोसमात विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. मुंबईने रविवारी 27 एप्रिलला वानखेडे स्टेडियममध्ये लखनौ सुपर जायंट्सचा धुव्वा उडवत सलग पाचवा तर एकूण सहावा विजय मिळवला. मुंबईने 216 धावांचा पाठलाग करणाऱ्या लखनौला 161 वर ऑलआऊट केलं. मुंबईने अशाप्रकारे 54 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला. मुंबईला या विजयानंतर तगडा फायदा झाला आहे. मुंबईने पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतल्याने टॉप 5 मधील संपूर्ण चित्रच बदललं आहे. मुंबईने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये 3 स्थानांची मॅरेथॉन झेप घेतली आहे. मुंबई लखनौ विरूद्धच्या सामन्याआधी पाचव्या स्थानी होती. मात्र विजयानंतर मुंबईने थेट दुसर्‍या क्रमांकावर उडी घेतली. मुंबईच्या या विजयामुळे दिल्ली...

तुम्ही या परिस्थितीत काश्मिरला आमच्या जागी असतात तर ?

Image
ट्रोलर्सच्या कर्तुत्वाला सलाम! तुमच्या जागी आम्ही असतो तर हेच केले असते.  पण तुम्ही या परिस्थितीत काश्मिरला आमच्या जागी असतात तर ?   काश्मीर पहलगाम इथे दहशतवादी हल्याची घटना घडल्यानंतर 3 दिवसांपासून आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना इथं मदत करण्यात व्यस्त होतो. त्यावेळी महाराष्ट्रात एक विडिओ वायरल होऊन काही जण खालच्या पातळीवर जाऊन प्रतिक्रिया देत आहेत असे जवळचे काही जण फोन करून सांगत होते पण अपुरी यंत्रणा आणि इथल्या आपल्या लोकांना मदत करणे हे अधिक महत्वाचे असल्याने त्यावर मला तात्काळ बोलता आले नाही.  पण इथली खरी परिस्थिती आपण समजून घ्यायला हवी. त्या विडिओ मध्ये मी घेतलेली भूमिका ही कोणत्या परिस्थितीत घेतली हे ही आपण समजून घ्यायला हवं.  22 एप्रिल 2025 रोजी पेहलगाम येथे हल्ला झाला त्यादिवशीच आम्ही सकाळी 9.30 वाजता श्रीनगर एअरपोर्टला पोहचलो होतो. फ्रेश होऊन आम्ही 11.30 ला बाहेर पडलो टुलिप गार्डन व इतर गार्डन बघत असताना पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती आम्हाला आमच्या वाहन चालकाकडून मिळाली. त्यावेळी त्यात 2 जण शाहिद झाले आहेत अशी तात्पुरती प्राथमिक माहि...

विजयसिंह राजे पंडित यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांनी पुढाकार घेतल्यास नक्कीच जिल्ह्यात येत्या पाच वर्षाच्या आत विमानतळ उभे राहील .

श्रेयासाठी याला त्याला नावे ठेवू नका.. आपले सर्व लोकप्रतिनिधी आपापली जबाबदारी चांगल्या प्रकारे ओळखून आहेत जो तो लोकप्रतिनिधी ज्याच्या त्याच्या परीने जिल्ह्याच्या विकासात योगदान देत आहे.. व सर्वांनी द्यायला देखील पाहिजे...!!   लोकसभेत बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी बीड येथे विमानतळ करावे ही मागणी केली होती त्यावेळेस बऱ्याच जणांनी विशेषतः बीड जिल्ह्यातीलच असलेल्यांनी टिंगल टवाळी करत अपमान करण्याचा प्रयत्न केला.. मात्र बजरंग बप्पा थांबले नाहीत..   केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी बीडच्या आजूबाजूला दोन ठिकाणी विमानतळ होऊ शकते अशा जागा देखील सुचवल्या व त्या पद्धतीने केंद्र सरकारकडून विचारणा देखील झालेली आहे..  यामध्ये आता गेवराईचे आमदार विजयसिंह राजे पंडित यांनी देखील विधानसभेत पाठपुरावा केला असता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज याबद्दल घोषणा केली.. त्याची सुरुवात खासदार बजरंग बाप्पांनी केलेली आहे तर याचा राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे काम सत्ताधारी आमदार विजयसिंह राजे पंडित यांनी केले आहे..    केंद्रात बाप्पांनी तर राज्यात विजयसिं...