Posts

Beed : बसस्थानक ईमारत जमीनदोस्त.

Image
Beed : बसस्थानक ईमारत जमीनदोस्त. .. इच्छित स्थळी जाणा-यांना मार्गस्थ करणारी बीड बस स्थानकाची पंचावन्न वर्षाची जुनी इमारत आज पाडायला सुरूवात झाली़. नाविन्याची उत्सुकता असणे हे स्वाभाविक आहे, मात्र जुन्याच्या बाबतीतील आठवणी विसरता येणे शक्य नाही. जेव्हा बस स्थानकाची एक एक भिंत व विट पडत होती़ तेव्हा बीड करांच्या बस स्थानका बाबतच्या जुन्या आठवणी बस स्थानकाच्या वास्तुभोवती रूझी घालत होत्या.  जी वास्तू प्रवाशांच्या सुख दुखा ची पन्नास वर्ष साक्षीदार राहिलेली आहे. ती वास्तू डोळ्यासमोर जमीनदोस्त झाली. बस स्थानकाची जुनी इमारत पाडताना पाहून प्रत्येक जण जुन्या इमारतीच्या आठवणींना उजाळा देत होता.... आजवर 53 वर्ष बीड बसस्थानकाची इमारत बीडकरांच्या सेवेत उभी होती.... आता नवीन बस स्थानकाची इमारत उभी राहते आहे...

*ऐका गोष्ट बाराची*

*ऐका गोष्ट बाराची* *12/12/12/12/12* *बारा हा जुन्या लोकांचा प्रिय अंक...* *मोजण्यासाठी द्वादशमान* *पध्दती...१२ची* *फूट म्हणजे १२ इंच* *एक डझन म्हणजे १२ नग.* *वर्षाचे महिने १२,* *नवग्रहांच्या राशी १२* *गुरू,शनी, मंगळ हानिकारक समजले जातात....१२ वे* *तप....१२ वर्षाचे,* *गुरुगृही अध्ययन....१२ वर्षे* *घड्याळात आकडे.....१२,* *दिवसाचे तास .....१२,* *रात्रीचे तास .....१२ ,* *मध्यरात्र म्हणजे रात्रीचे..१२* *मध्यान्ह म्हणजे दुपारचे..१२* *एकादी गोष्ट तुटली फुटली म्हणजे तिचे वाजले....१२* *सकाळच्या बाजारात उरला सुरला माल १२ च्या भावात काढतात..* *पूर्वी मुलीचा विवाह १२ व्या वर्षी करत..* *इंग्लंडमध्ये १२ पेन्सचा १ शिलिंग* *बाळाचे नामकरण १२ व्या दिवशी केले जाते* *मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांचे..*  *बलुतेदार,बारभाई,बारावाटा...सगळे १२,* *बेरकी माणूस म्हणजे* *१२ गावचं पाणी प्यायलेला* *तसेच कोणाचेही न ऐकणारी रगेल व रंगेल व्यक्तीला १२ चा आहे असे म्हणतात.* *ज्योतिर्लिंग.....१२ आहेत,* *कृष्ण जन्म....रात्री १२* *राम जन्म दुपारी...१२ ,* *मराठी भाषेत स्वर...१२* *त्याला म्हणतात...बाराखडी* *१२ गावचा...

रानमेवा

Image
रानमेवा   आमचं एकत्र कुटुंब होतं .अल्प शेती व घरात माणसं फार असायची.  त्यामुळे कष्टाच्या कामाची विभागणी ही प्रत्येकालेच वाटून देली होती.आमचा बाप घरचं करून दुसऱ्याच्या खटल्यात हप्तेवारी काम करायचा.कधी सवड भेटलीच तर घरच्या बैलबंडीत घरच्याच वावरात शिल्लक पिकलेलं हायब्रीड ज्वारीचे दोन,चार पोतं घेऊन आजूबाजूच्या बाजारातही ईकायला घेऊन जायचा.मीही सोबत जायचो.तेव्हा आताच्या सारखं गव्हाच्या पेक्षा ज्वारी वरचढ नव्हती. फक्त तिन रूपये किलो भाव होता.एक दोन पोते खपले म्हणजे शेपाचशे रुपये भेटत.तेवढाच पैसा बजारहाटाले कामी यायचा. बाप निरं,पिरं झालं म्हणजे बजारहाट करायचा. तोपर्यंत चांगला तापलेला सुर्य लाललाल जर्द होऊन मावळतीले लागायचा. मी बैलबंडी राखायचो. बाजाराच्या एका कोपऱ्यात सोडलेल्या बैलबंडीतून मी चाकाचे बैल सोडून जवळच्या हौदावरून पाणी पाजून आणायचो.व संग आणलेली कडब्याची पेंडी बैलाईपुढे टाकायचो.व बंडीत बसून गुळाच्या भेल्या ईकणारे,शेव चिवडा ईकणारे,भाजीपाला,जवसाचं, मद्रास,खोबऱ्याचं तेलाचे डबे घेऊन ईकणाऱ्याचं बारकाईनं मी निरिक्षण करायचो. ज्वारीले तेव्हा पीवर गरीबाचं खाद्य समजल्या ज...

दोस्ती

दोस्ती    मव्हा आन मांगाच्या ईक्रम्याचा लय दोस्ताना व्हता.आम्ही दोघबी संगमंगच राह्याचो.तो आन मी एकाच इयत्तेत शिकत व्हतो.ईक्रम्याचा बाप आमच्या कामालं व्हता.त्यामुळं ईक्रम्या आण मव्हा दोस्ताना आंजुकच घट्ट झाला व्हता.सनवारी आण आईतवारी ईक्रम्या आमच्याच शेतावर आभ्यास करायलं यायचा.आम्ही डाब डाब ,घनघडी,गज खुपशी,दगड का माती,ईष्याआमृत, सोनसाखळी आसे वेगवेगळे खेळ खेळायचो.आमचा दोस्ताना ईतका पक्का झालता कि एकमेकाशिवाय आम्हाल करमामचच नाही.ईक्रम्या कव्हा घरी आला की मही माय त्यालं खांडुळ्याआड ठुलेल्या फुटक्या कपात च्या देयाची.च्या पिल्यावर ईक्राम्या पाणी मांघुन ते कप ईसळुन ठुयाचा.आम्ही दोघं शाळतं एकाच बेंचावर बसायचो.चिंचा,बोर,करवंद,आसं बरच काही आम्ही राना वनातुन आणायचो आण वाटुन खायाचो.          एकदा म्या आण ईक्राम्यान लय मोठ्या कोई गोळा केलत्या.त्या फोडुन भेटलेल्या पैशात आम्ही चुणचुण्या गोळ्या आनल्या व्हत्या.कोईचे विस पैसे झालते.आम्हालं तेव्हड्याच्या बारा गोळ्या येयाल पायजे व्हत्या पण त्या मारवाड्याच चुकलं आसल नाय त उगिच मनुन मना त्यानं तेरा गोळ्या देलत्या.आसच कश्या...

प्रवास नेमकाच ग्रॅजुयट झाल्यानं मलं पोस्ष्ट ग्रॅजुएशनसाठी औरंगाबादलं जायाच व्हतं.

प्रवास              नेमकाच ग्रॅजुयट झाल्यानं मलं पोस्ष्ट ग्रॅजुएशनसाठी औरंगाबादलं जायाच व्हतं. तिथल्या कॉलेजात मव्हा नंबर लागला व्हता.पहाटं नवची एष्टी व्हती.नवनंतर एष्टी नसल्यानं म्या पाहाटं लवकरच गडबडीनं  आटपुण निंघायची तयारी केली.निघंतानी पुन्हा एकदा कागदपत्र निट तपासले.मायनं गडबडीत दोन चार भाकरी आन मिरचीचा ठेचा मलं बांधुन देलता.गावापसुन एष्टी थांबा तिनेक किलोमिटर लांब आसल्यानं मि साडेसातलच घराबाहीर पडलो.सगळा सस्ता सामसुम व्हता.मी आपलं एष्टी हुकु नाही मनुन झपाझप चालत एकदाचा फाट्यावर येऊन एष्टीची वाट पहात बसलो.फाट्यावर ना निवारा व्हता ना पाण्याची सोय व्हती.तिथं मह्या सारखे एक दोन प्रवासी आन दोनचार मोकाट कुत्रे सोडले तं काय बी नवतं.एष्टीचा नवचा टाईम व्हता.साडेनव झाले तरी आंजुक एष्टि आली नवती.म्या आपला तिन तिनदा घड्याळात टाईम पाहु लागलो.मलं हि एष्टी हिंगोलीलोकच व्हती.तिथुन आकरा वाजताची एष्टी पकडायची व्हती.मह्या मनाची तळमळ व्हवु लागली.आकराची एष्टी चुकली तं डबल तिनलोक दुसरी गाडी नवती.आश्यात औरंगाबादलं जायालं उशीर झाला आसता.मी ईचार करतच व्हतो तेव्हड्य...

शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.

Image
' शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब व मान्यवर बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांच्या समवेत गोपीनाथ गड येथे जाऊन लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले, तसेच प्रभू वैद्यनाथांचे दर्शन व विधिवत पूजन केले.  परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील 286.68 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन यावेळी संपन्न झाले. त्याचबरोबर परळी एमआयडीसी, कृषी महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सोयाबीन संशोधन व प्रक्रिया केंद्र, बीड जिल्हाधिकारी कार्यालय, बीड मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कृषी भवन बीड, परळी शहर बस स्थानक यांसह विविध सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.  कृषी उत्पन्न बाजार समिती परळी अंतर्गत सिरसाळा ता.परळी येथील कै.पंडित अण्णा मुंडे व्यापारी संकुलाचे यावेळी लोकार्पण संपन्न झाले.  या कार्यक्रमात कृषी, सामाजिक न्याय, यांसह विविध विभागाच...

किसन्याची भूक!.............

Image
किसन्याची भूक!............. दिवाईचा सन जवळ येऊ लागल्याने किसन्या मांग अन त्याची बायको इंद्राचा हात अधीकाअधिक फळे तयार करण्यासाठी अधिकच जोरात सुरु झाला होता. दरोज सकाई किसन्या मांग आपल्या पानोया तोडाच्या सगाट्याले खरपावर घासून त्याची धार अधिकच चर्रर्रर्र करायचा. किसन्याले वाटे मोठमोठ्या सिंदीच्या पांचोया एका झटक्यात तुटल्या म्हणजे बरं होते मुन, तो सकाईचं ईया पाजवायचा. इंद्री,.... त्याची बायको झाकटीतचं उठून चुलीतल्या कोयश्यानं दात घासून चुलीवर गुयाचा च्या ठेऊन लगेच भाकर भाजी कराले बसाची. . किसन्या सकाईचं नदीवर जाऊन तिकडेच आपला सकाळचा कार्यक्रम आटोपून कोणाच्याही कुपावरच्या काळ्या कुळ्या जमा करून इंद्रीच्या जवळ सयपाकासाठी आणून द्यायचा. गावातली गावगाड्याची कामे पोळा संपल्यावर आटोपून जायची त्यामुळं किसनाचे हात आता रिकामेच असायचे. शिवाय त्याच्या तिन्ही पोरीचे त्याने लग्न उरकवल्यामुळे किसन्या अन त्याची बायको इंद्री दोघेच जन आता पलाटावर राहत होते. किसन्याची पुरी हयात गावगाड्याचे काम करण्यातचं निघून गेली होती. किसन्याचं वय आता झालं होतं. इंद्रा,त्याची बायको तेही आता थकली होती....