Posts

नाथा पुरे आतामराठ्यानो ओळखा सत्तेचा गनिमी कावाक्रॉसलाईन दैनिक लोकाशा

Image
नाथा पुरे आता मराठ्यानो ओळखा सत्तेचा गनिमी कावा क्रॉसलाईन  दैनिक लोकाशा एकनाथ शिंदे शेवटच्या भाषणात कामाचे बोलतील असा कयास अर्थात अंधश्रद्धा मिडिया सह समाजाला होती , जरांगे गेली अनेक महिने सरसकट प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी करत आहेत , मात्र ४४ मिनिटांच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी सरसकट कुठलाही शब्द वापरलेला नाही , न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल प्राप्त आणि कायदेशीर बाबी तपासून लवकर स्वीकारेल अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली , आणखी एक फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशन घेऊ असे एक ते म्हटले . हो न , त्यांनी परवाच्या भाषणात कुणबीचा कुठलाही आकडा सांगितला नाही , यातून ओबीसी मध्ये किती मराठे जाणार हे नक्की नाही . कारण या शिवाय कुणाचीही भीती किवा आक्रमण निश्चित होणार नाही . ५४ लाख नोंदींचा आकडा आत्ताचा नाही तर एकुन चा आहे , या तीन महिन्यात २८ ते २९ हजार नोंदी मिळाल्या आहेत , हे बहुतेकांना माहित नाही . अनेकांनी असे समजून घेतले कि शिंदे यांनी शब्द पाळला आहे मात्र इतर जातींना वंशावळ दाखवली कि काष्ठ निघते , तर त्या नियमाने नोंदी सापडलेल्या वंशात देखील कुणबी द्याव असे म्हणणे समोर आले आह...

ज्यांचा जन्म १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७६, १९७७, १९७८, १९७९, १९८०, १९८१, १९८२, १९८३, १९८४, १९८५ ते १९९५ साली झाला आहे खास त्या पिढी साठी हा लेख

Image
ज्यांचा जन्म १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७६, १९७७, १९७८, १९७९, १९८०, १९८१, १९८२, १९८३, १९८४, १९८५ ते १९९५ साली झाला आहे खास त्या पिढी साठी हा लेख ही पीढ़ी आता 35 ओलाडून 50 कडे चाललीय, 'हया' आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे हि पिढी कायम उंबरठ्यावर राहिली..... १,२,५,१०,२०,२५,५० पैसे बघीतलेली ही पीढीत पाहुणे कडून लाज न बाळगता पैसे घेत होती. शाई-बोरु/ पेन्सिल / पेन पासून सुरवात करून, ही पीढी आता, स्मार्ट फोन, लॕप्टाॕप, पीसी, उतारवयात सराईतपणे हाताळत आहे*. ज्या पिढीच्या बालपणी सायकल सुद्धा एक चैन, असलेली, पण आता ह्या उतारवयात सराईतपणे स्कूटर, कार चालवणारी ही पिढी, अवखळ तर कधी गंभीर.... खूप भोगलेली आणि खूप सोसलेली, पण पूर्ण संस्कारित.... *टेप रेकॉर्डर, पॉकेट ट्रान्झिस्स्टर* ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती.  *मार्कशीट* आणि *टिव्ही* च्या येण्यानी यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही अशी ही शेवटची पिढी.  कुकरच्या रिंग्स, टायर, असल्या गोष्टी घेऊन लहानपणी *गाडी गाडी खेळणं* यात त्यांना काहीही ...

Beed : बसस्थानक ईमारत जमीनदोस्त.

Image
Beed : बसस्थानक ईमारत जमीनदोस्त. .. इच्छित स्थळी जाणा-यांना मार्गस्थ करणारी बीड बस स्थानकाची पंचावन्न वर्षाची जुनी इमारत आज पाडायला सुरूवात झाली़. नाविन्याची उत्सुकता असणे हे स्वाभाविक आहे, मात्र जुन्याच्या बाबतीतील आठवणी विसरता येणे शक्य नाही. जेव्हा बस स्थानकाची एक एक भिंत व विट पडत होती़ तेव्हा बीड करांच्या बस स्थानका बाबतच्या जुन्या आठवणी बस स्थानकाच्या वास्तुभोवती रूझी घालत होत्या.  जी वास्तू प्रवाशांच्या सुख दुखा ची पन्नास वर्ष साक्षीदार राहिलेली आहे. ती वास्तू डोळ्यासमोर जमीनदोस्त झाली. बस स्थानकाची जुनी इमारत पाडताना पाहून प्रत्येक जण जुन्या इमारतीच्या आठवणींना उजाळा देत होता.... आजवर 53 वर्ष बीड बसस्थानकाची इमारत बीडकरांच्या सेवेत उभी होती.... आता नवीन बस स्थानकाची इमारत उभी राहते आहे...

*ऐका गोष्ट बाराची*

*ऐका गोष्ट बाराची* *12/12/12/12/12* *बारा हा जुन्या लोकांचा प्रिय अंक...* *मोजण्यासाठी द्वादशमान* *पध्दती...१२ची* *फूट म्हणजे १२ इंच* *एक डझन म्हणजे १२ नग.* *वर्षाचे महिने १२,* *नवग्रहांच्या राशी १२* *गुरू,शनी, मंगळ हानिकारक समजले जातात....१२ वे* *तप....१२ वर्षाचे,* *गुरुगृही अध्ययन....१२ वर्षे* *घड्याळात आकडे.....१२,* *दिवसाचे तास .....१२,* *रात्रीचे तास .....१२ ,* *मध्यरात्र म्हणजे रात्रीचे..१२* *मध्यान्ह म्हणजे दुपारचे..१२* *एकादी गोष्ट तुटली फुटली म्हणजे तिचे वाजले....१२* *सकाळच्या बाजारात उरला सुरला माल १२ च्या भावात काढतात..* *पूर्वी मुलीचा विवाह १२ व्या वर्षी करत..* *इंग्लंडमध्ये १२ पेन्सचा १ शिलिंग* *बाळाचे नामकरण १२ व्या दिवशी केले जाते* *मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांचे..*  *बलुतेदार,बारभाई,बारावाटा...सगळे १२,* *बेरकी माणूस म्हणजे* *१२ गावचं पाणी प्यायलेला* *तसेच कोणाचेही न ऐकणारी रगेल व रंगेल व्यक्तीला १२ चा आहे असे म्हणतात.* *ज्योतिर्लिंग.....१२ आहेत,* *कृष्ण जन्म....रात्री १२* *राम जन्म दुपारी...१२ ,* *मराठी भाषेत स्वर...१२* *त्याला म्हणतात...बाराखडी* *१२ गावचा...

रानमेवा

Image
रानमेवा   आमचं एकत्र कुटुंब होतं .अल्प शेती व घरात माणसं फार असायची.  त्यामुळे कष्टाच्या कामाची विभागणी ही प्रत्येकालेच वाटून देली होती.आमचा बाप घरचं करून दुसऱ्याच्या खटल्यात हप्तेवारी काम करायचा.कधी सवड भेटलीच तर घरच्या बैलबंडीत घरच्याच वावरात शिल्लक पिकलेलं हायब्रीड ज्वारीचे दोन,चार पोतं घेऊन आजूबाजूच्या बाजारातही ईकायला घेऊन जायचा.मीही सोबत जायचो.तेव्हा आताच्या सारखं गव्हाच्या पेक्षा ज्वारी वरचढ नव्हती. फक्त तिन रूपये किलो भाव होता.एक दोन पोते खपले म्हणजे शेपाचशे रुपये भेटत.तेवढाच पैसा बजारहाटाले कामी यायचा. बाप निरं,पिरं झालं म्हणजे बजारहाट करायचा. तोपर्यंत चांगला तापलेला सुर्य लाललाल जर्द होऊन मावळतीले लागायचा. मी बैलबंडी राखायचो. बाजाराच्या एका कोपऱ्यात सोडलेल्या बैलबंडीतून मी चाकाचे बैल सोडून जवळच्या हौदावरून पाणी पाजून आणायचो.व संग आणलेली कडब्याची पेंडी बैलाईपुढे टाकायचो.व बंडीत बसून गुळाच्या भेल्या ईकणारे,शेव चिवडा ईकणारे,भाजीपाला,जवसाचं, मद्रास,खोबऱ्याचं तेलाचे डबे घेऊन ईकणाऱ्याचं बारकाईनं मी निरिक्षण करायचो. ज्वारीले तेव्हा पीवर गरीबाचं खाद्य समजल्या ज...

दोस्ती

दोस्ती    मव्हा आन मांगाच्या ईक्रम्याचा लय दोस्ताना व्हता.आम्ही दोघबी संगमंगच राह्याचो.तो आन मी एकाच इयत्तेत शिकत व्हतो.ईक्रम्याचा बाप आमच्या कामालं व्हता.त्यामुळं ईक्रम्या आण मव्हा दोस्ताना आंजुकच घट्ट झाला व्हता.सनवारी आण आईतवारी ईक्रम्या आमच्याच शेतावर आभ्यास करायलं यायचा.आम्ही डाब डाब ,घनघडी,गज खुपशी,दगड का माती,ईष्याआमृत, सोनसाखळी आसे वेगवेगळे खेळ खेळायचो.आमचा दोस्ताना ईतका पक्का झालता कि एकमेकाशिवाय आम्हाल करमामचच नाही.ईक्रम्या कव्हा घरी आला की मही माय त्यालं खांडुळ्याआड ठुलेल्या फुटक्या कपात च्या देयाची.च्या पिल्यावर ईक्राम्या पाणी मांघुन ते कप ईसळुन ठुयाचा.आम्ही दोघं शाळतं एकाच बेंचावर बसायचो.चिंचा,बोर,करवंद,आसं बरच काही आम्ही राना वनातुन आणायचो आण वाटुन खायाचो.          एकदा म्या आण ईक्राम्यान लय मोठ्या कोई गोळा केलत्या.त्या फोडुन भेटलेल्या पैशात आम्ही चुणचुण्या गोळ्या आनल्या व्हत्या.कोईचे विस पैसे झालते.आम्हालं तेव्हड्याच्या बारा गोळ्या येयाल पायजे व्हत्या पण त्या मारवाड्याच चुकलं आसल नाय त उगिच मनुन मना त्यानं तेरा गोळ्या देलत्या.आसच कश्या...

प्रवास नेमकाच ग्रॅजुयट झाल्यानं मलं पोस्ष्ट ग्रॅजुएशनसाठी औरंगाबादलं जायाच व्हतं.

प्रवास              नेमकाच ग्रॅजुयट झाल्यानं मलं पोस्ष्ट ग्रॅजुएशनसाठी औरंगाबादलं जायाच व्हतं. तिथल्या कॉलेजात मव्हा नंबर लागला व्हता.पहाटं नवची एष्टी व्हती.नवनंतर एष्टी नसल्यानं म्या पाहाटं लवकरच गडबडीनं  आटपुण निंघायची तयारी केली.निघंतानी पुन्हा एकदा कागदपत्र निट तपासले.मायनं गडबडीत दोन चार भाकरी आन मिरचीचा ठेचा मलं बांधुन देलता.गावापसुन एष्टी थांबा तिनेक किलोमिटर लांब आसल्यानं मि साडेसातलच घराबाहीर पडलो.सगळा सस्ता सामसुम व्हता.मी आपलं एष्टी हुकु नाही मनुन झपाझप चालत एकदाचा फाट्यावर येऊन एष्टीची वाट पहात बसलो.फाट्यावर ना निवारा व्हता ना पाण्याची सोय व्हती.तिथं मह्या सारखे एक दोन प्रवासी आन दोनचार मोकाट कुत्रे सोडले तं काय बी नवतं.एष्टीचा नवचा टाईम व्हता.साडेनव झाले तरी आंजुक एष्टि आली नवती.म्या आपला तिन तिनदा घड्याळात टाईम पाहु लागलो.मलं हि एष्टी हिंगोलीलोकच व्हती.तिथुन आकरा वाजताची एष्टी पकडायची व्हती.मह्या मनाची तळमळ व्हवु लागली.आकराची एष्टी चुकली तं डबल तिनलोक दुसरी गाडी नवती.आश्यात औरंगाबादलं जायालं उशीर झाला आसता.मी ईचार करतच व्हतो तेव्हड्य...