Posts

*दर्प नको संघर्ष हवा*मराठ्या लई भोगलस आजवर ,*वाट चुकू नगस ...*

Image
*दर्प नको संघर्ष हवा* मराठ्या लई भोगलस आजवर ,*वाट चुकू नगस ...* *क्रॉसलाईन* तोंडातला घास बाहेर काढला तर तळपायाची मस्तकाला जाते , आरक्षणाचा घास तर पोटात पोहचला होता , तोफा झडून झाल्या होत्या , केवळ पाटलांचे नावे घेऊन सगळ्या मराठ्यांचे भले समजण्याची चूक व्यवस्थेने केले आणि त्यात गरजवंत मराठा पाटलांच्या नावाखाली दारिद्र्याच्या खाईत खीपचत पडला , सराटीत आलेला लक्षावधीचा होन जरांगेने आणलेला नव्हता जरांगेच्या निमित्ताने जमलेला होता , परवाची सभा नव्हती मराठ्यांचा इज्तेमा होता , पोटासाठी आणि जातीसाठी गावची गाव उतरली होती , कुणाला तरी शिव्या द्यायच्यात किवा कुठल्या इतर जातीच्या नावाने द्वेष त्या गरीब मराठ्यांच्या मनात नव्हता नसेल , त्याला फक्त वाटले कि गेल्यावर मिळणार आहे , न्यायलयाची वाट बिकट त्यात सारे सराटे म्हणून सराटीचा पर्याय डोळे झाकून मराठ्यांनी स्वीकारला , चार दोन गाबडे हीट वाढवतात नाही असे नाही मात्र म्हणून धोतरातला विठोबा आणि फाटक्या लुगड्यातल्या रखुमाईची वारी होती ती . जरांगे यांना अभ्यास नाही मात्र ते निरागस आहेत , आणि त्यांचे निरागस असणे इतर अभ्यासू आणि धूर्त नेत्यांच्...

जयभवानी ऊसाला २७०० रू पेक्षा जास्तीचा भाव देईल - अमरसिंह पंडित==========जय भवानीचा बॉयलर प्रदीपन समारंभ संपन्न============================

Image
जयभवानी ऊसाला २७०० रू पेक्षा जास्तीचा भाव देईल - अमरसिंह पंडित ========== जय भवानीचा बॉयलर प्रदीपन समारंभ संपन्न ============================ गेवराई दि. १६ (प्रतिनिधी) चालू हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे आपल्याला अडचणीला सामोरे जावे लागणार आहे, कर्जाचे व्याजही आधीक दराने द्यावे लागणार आहे, अशा प्रतिकुल परिस्थितीत योग्य नियोजन करुन आपण गळीत हंगाम सुरु करत आहोत. अडचणीचा काळ असला तरी जय भवानी ऊसाला जास्तीत जास्त भाव देण्याचे नियोजन करणार आहे, या हंगामात ऊसाला प्रती टन २७००/- रुपयाच्या पुढेच भाव असेल असा विश्वास जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले. कारखान्याच्या ४१ व्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभात ते बोलत होते. जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या ४१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ सोमवार दि.१६ ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र चाकरवाडी संस्थानचे महंत ह.भ. प. महादेव महाराज यांच्या शुभहस्ते आणि कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव दादा पंडित, चेअरमन अमरसिंह पंडित, माजी चेअरमन जयसिंग पंडित, यांच्यासह सर्व संचालक मंडळाच्या उपस्थित संपन्न झाला. ...

गोपीचंद पडळकरांची धनगर जागर यात्रा अमरावतीत |

गोपीचंद पडळकरांची धनगर जागर यात्रा अमरावतीत | मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणासाठी 40 दिवसांचा वेळ दिला आहे. त्याला आज तीस दिवस पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये सभा घेतली, या सभेला लाखोंच्या संख्येनं मराठा समाज उपस्थित होता. सभेत बोलताना जरांगे यांनी सरकारला 24 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यावर आता भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लहनपणचा सिनेमा

Image
लहनपणचा सिनेमा . *********************** लहानपणी आमच्या शाळेसमोर, सिनेमावाला यायचा. पाचपैशात पंधरा मिनीटात, मुंबईला न्यायचा. वाघ सिंह हत्ती घोडे, सगळेच मधे असायचे. सगळं पहायला मात्र त्या वेळी, पाच पैसेच नसायचे. रडुन रडुन वडीला कडुन, पाच पैसे अनायचो. गुरुजींनी फिस मागितली असं, खोटं खोटं म्हणायचो. एव्हढ्याशा पेटीत वाघ सिंह, बसत असतील कसे. लहान सहान गोष्टीचं ही, केवढं कुतूहल असे. आता कितीतरी पिक्चर नुस्ते, डाउनलोड करता येतात. जसे पहायचे तसे किती ही, जोड तोड करता येतात. रहाट पाळण्याकडे नुसता मी, कुतुहलानं बघत राही. आता विमानात बसलं तरी ही, त्याचं काहीच वाटत नाही. विचार केला की नेहमी वाटतं, आता दिवस कसले आहेत. लहानपणचे ते प्रसंग काळजात, घर करुन बसले आहेत. हल्लीच्या या विज्ञान युगात, जुणं सगळं जळुन गेलं. माझ्या लहानपणा सोबतच, कुतुहलही पळुन गेलं. आता नेहमी मला वाटत राहतं पुन्हा एकदा लहान व्हावं । पोट दुखायचं निमीत्त करुन, शाळे मधुन पळुन यावं.                                   

Bihar Train Mishap : बिहारच्या बक्सरमध्ये नॉर्थ इस्ट एक्स्प्रेसचे २० डबे रुळावरुन घसरले, चार जणांचा मृत्यू तर ८० हून अधिक प्रवासी जखमी

Image
Bihar Train Mishap : बिहारच्या बक्सरमध्ये नॉर्थ इस्ट एक्स्प्रेसचे २० डबे रुळावरुन घसरले, चार जणांचा मृत्यू तर ८० हून अधिक प्रवासी जखमी Buxar Bihar Train Mishap: रात्री ९.३५ च्या दरम्यान ही घटना घडली, अनेक प्रवाशांना काय घडतंय ते कळलंही नाही आणि काही सेकंदात अपघात झाला Bihar Train Mishap Today: बिहारमधल्या बक्सर भागात नॉर्थ इस्ट एक्स्प्रेस रुळावरुन घसरल्याने अपघात झाला. टूरीगंजे ते रघुनाथपूर दरम्यान हा अपघात झाला. या ठिकाणी आता मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला, ८० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना पाटणा येथील आयजीआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही ट्रेन दिल्लीहून कामाख्या या ठिकाणी चालली होती. या ट्रेनचे २० डबे रुळावरुन घसरले आहेत. ज्या ठिकाणी रेल्वेचे डबे घसरले तिथे मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. NDRF, SDRF, जिल्हा प्रशासन, रेल्वे अधिकारी यांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. २३ डब्यांची ही ट्रेन सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी दिल्लीतल्या आनंद विहार ट...

इस्रायल-हमास युद्ध: हे युद्ध इस्रायलला महागात पडणार, हमासचा खात्मा करण्याचे लक्ष्य... 56000 कोटी रुपये लागणार!

Image
इस्रायल-हमास युद्ध: हे युद्ध इस्रायलला महागात पडणार, हमासचा खात्मा करण्याचे लक्ष्य... 56000 कोटी रुपये लागणार! बँक हापोअलिमचे मुख्य रणनीतीकार मोदी शफ्रीर यांच्या मते, इस्रायल-हमास युद्धाची सद्यस्थिती पाहता, युद्धाचा खर्च इस्रायलच्या जीडीपीच्या किमान निम्मा असेल असा अंदाज बांधला जाऊ शकतो. १.५ टक्क्यांपर्यंत असू शकतो. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध (इस्रायल-हमास युद्ध) सतत वाढत आहे. दरम्यान, इस्रायलमध्ये केवळ सार्वजनिक मालमत्तेसह जीवित आणि मालमत्तेची हानी झाली नाही, तर हमासच्या प्रत्युत्तरादाखल हल्ल्यामुळे गाझा पट्टीची स्थिती बिकट झाली आहे. वृत्त लिहिपर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्टीतील मृतांचा आकडा 1354 वर पोहोचला होता. या युद्धात इस्रायलचे मोठे नुकसान होत असले तरी युद्धाचा त्याच्या बजेटवर मोठा परिणाम होणार आहे. देशातील सर्वात मोठी बँक Hapoalim ने इस्रायल-हमास युद्धावरील खर्चाबाबत आपला अंदाज व्यक्त केला आहे, जो खूप मोठा आहे. हमासचा खात्मा करण्यासाठी २७ अब्ज शेकेल खर्च! दोन देशांमधील कोणतेही युद्ध हे अर्थव्यवस्थेसाठी आव्हानात्मक असते. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू अस...

पुण्यातील महापालिकेच्या जलतरण तलावातील सिलेंडरमधून क्लोरीन वायूची गळती झाली.

Image
पुण्यातील महापालिकेच्या जलतरण तलावातील सिलेंडरमधून क्लोरीन वायूची गळती झाली. पुण्यातील नागरीक संचालित जलतरण तलावात क्लोरीन वायू घेतल्याने १६ जणांना रुग्णालयात दाखल पुण्यातील महापालिकेच्या जलतरण तलावातील सिलेंडरमधून क्लोरीन वायूची गळती झाली. मंगळवारी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरी चालवल्या जाणार्‍या जलतरण तलावातून गळती झालेल्या क्लोरीन वायूमुळे 16 जण आजारी पडले, असे अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले. कासारवाडी परिसरातील महापालिकेच्या जलतरण तलावात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सिलिंडरमधून गॅस गळती झाली, असे अधिकाऱ्याने सांगितले. अग्निशमन अधिकार्‍यांनी सिलिंडर सील केला आणि गॅस पाण्यात विरघळू देण्यासाठी तो पूलमध्ये बुडविला, असे ते म्हणाले. "आम्ही परिसराला वेढा घातला आणि लोकांना बाहेर काढले. पूलमध्ये असलेल्या किमान 16 लोकांनी वायूचा श्वास घेतला आणि त्यांना उपचारासाठी नागरी रुग्णालयात नेण्यात आले," अधिकारी म्हणाले, काही जीवरक्षकांना देखील त्रास झाला. क्लोरीन वायूचा श्वास घेतलेल्या लोकांनी खोकला आणि मळमळ झाल्याची तक्रार केली, एका नागरी अधिकाऱ्यान...